त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे “वैकुंठ चतुर्दशी”

“वैकुंठ चतुर्दशी”


त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही ‘वैकुंठ चतुर्दशी’ म्हणून साजरी केली जाते.या दिवशी आवळीच्या झाडाखाली बसून जे जेवण करतात, त्यास आवळी भोजन म्हणतात.चातुर्मासी चतुर्दशी हा जैन धर्मातील सण आणि उत्सव आणि वैकुंठ चतुर्दशी हे हिंदू धर्मातील व्रत या दिवशी केले जाते. चातुर्मासामध्ये विष्णू शेषावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो, असे म्हणतात.

        वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात.पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान विष्णु यांनी काशी येथे महादेवाला एक हजार कमळ वाहण्याचा संकल्प केला होता. यावेळी महादेवाने विष्णुची परिक्षा घेण्यासाठी या कमळातून एक कमळ कमी केले. यावर भगवान विष्णु यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला. विष्णुची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णुला वर दिला की, कार्तिक मासनंतर येणारी चतुर्दशी ‘वैकुंठ चतुर्दशी’ म्हणून ओळखली जाईल. जो कोणी हे व्रत करील त्याला वैकुंठ प्राप्ती होईल.

वरील माहिती आमच्या वाचनात आली असून आम्ही याच्याशी सहमत आहोतच असे नाही .

Scroll to Top