आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय तेलनाडे फाउंडेशनच्या वतीने संवादाचे आयोजन केले आहे. इचलकरंजी शहरासह मतदारसंघातील कोरोची, खोतवाडी, तारदाळ, कबनूर, चंदूर, शहापूर या गावांमध्ये या संवाद यात्रेचे आयोजन केले आहे.
यामध्ये प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांची भेट घेण्याचा प्रयत्न फाउंडेशनच्या वतीने करण्यात येईल अशी माहिती फौडेशन तर्फे देण्यात आली.