इचलकरंजी / प्रतिनिधी
मध्यप्रदेश येथील जबलपूरच्या ज्ञानगंगा इन्स्टिटयूट, येथे झालेल्या आयडीई बुटकॅम्प या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत डीकेटीईच्या इटीसी विभागाला तृतीय क्रमांकाचे बक्षिस प्राप्त झाले आहे. या स्पर्धेमध्ये डीकेटीईच्या इटीसी इंजिनिअरींग विभागातील पूर्वा कुलकर्णी, सम्राज्ञी माने, अद्वैत कुलकर्णी, तनिष कुलकर्णी व अवधूत महाजन या पाच विद्यार्थ्यांनी डॉ. जे.पी. खरात यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली गायीच्या आरोग्यासाठी स्मार्ट कॉलर या प्रकल्पासाठी तृतीय क्रमांकाचे बक्षिस मिळविले आहे.
इनोव्हेशन सेल (एमआयसी) आणि एआयसीटीई दिल्ली यांच्या वतीने या बुटकॅम्प स्पर्धा आयोजिली होती. डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी आयोटीचा वापर करुन गायीसाठी स्मार्ट कॉलर हे उपकरण विकसीत केले आहे. शेतकऱ्यांना गायींच्या आरोग्यविषयी माहिती मोबाईल अॅपद्वारे दिली जाते. यामुळे गायींवर वेळीच उपचार करणे शक्य होते. या अधुनिक टेक्नॉलॉजीमुळे गायींचे आरोग्य सुधारुन दूध उत्पादन वाढवण्यास मदत होते.
या स्पर्धेत देशभरातील १०० हून अधिक अभियांत्रिकी कॉलेजमधील ६०० हून अधिक ग्रुपसनी सहभाग घेतला होता. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्वस्त यांचे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन तर संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.एल.एस. अडमुठे, इटीसी विभागप्रमुख डॉ.एस.ए. पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
