कोल्हापूर / प्रतिनिधी
संग्रहित छायाचित्र
कोल्हापूर विभागात १ लाख ३२ हजार विद्यार्थी, ३५७ परीक्षा केंद्रे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने शुक्रवार, दि. २१ फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षेस सुरुवात झाली आहे. कोल्हापूर विभागातून एक लाख ३२ हजार ९२६ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत, अशी माहिती कोल्हापूर बोर्डाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. कोल्हापूर बोर्डाच्या वतीने दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे.
सर्व साहित्य परीक्षा केंद्रांवर पोहोच करण्यात आले आहे. कोल्हापूर विभागात २ हजार ४३५ शाळा तर ३५७परीक्षा केंद्रे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून ५४,८१०, सांगली ३९,६१९ तर साताऱ्यातून ३८,४९७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी ४५ परिरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी परीक्षा केंद्रावर एक तास तर परीक्षा दालनात किमान अर्धा तास उपस्थित राहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी बोडनि दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन अध्यक्ष क्षीरसागर यांनी केले आहे.

